Monday 30 January 2012

मुंबई स्थित श्री प्रवीन सोनीजी के अदभूत अनुभव


पुज्य चितळेबाबा के साधकों के अनुभव
मुं
बई के श्री प्रवीन सोनीजी ने अपना कथन टेप किया उसका रुपांतरण प्रस्तूत कर रहे है....

Figure 1श्री. प्रवीन सोनीजी पुज्य चितळेबाबा के साथ
मित्रों,
म सब चितलेबाबा के साधक परिवार में से हैं। मुझे खुश़ी है कि आप सब को मैं मेरे विचार तथा अनुभव से अवगत कर रहा हूं।
बाबा से  प्रथम  भेंट
बात आसाम की है। कारोबार के संबंध में श्री. सुशील भाटियाजी से आसाम स्थित तिनसुखिया में मेरी दोस्ती हुई। उनके कहनेपर मैं कर्नल तिहोतियाजी से मिलने दिनजान नाम के आर्मी युनिट में गया था । वहां से हम बाबा (उन दिनों मैं उन्हे गुरुजी नाम से जानता था) को मिलने एयर फोर्स के कँम्प में पहुंचे थे। वह था फरवरी महिना। साल था 1995 । शुरू में तो मैं मिलने को इच्छुक नहीं था। फिर भी भाटियाजी के मनाने पर चला गया। पहली मुलाकात तीन चार घंटे चली । खुब बातें हुई। बड़ा अच्छा लगा। बाबा की एक बात तबसे अच्छी लगने लगी कि वे दूसरों के भले की बात हमेशा करते है। जेब भले खाली हो फिर भी दिल भरा है ऐसा लगा। जब वहांसे निकलने का समय हुआ तब पांव छूने की रीति से मैं जरा हिचकिचा गया। क्योंकि मातापिता के मैं सिवा किसी के पैर नहीं छूता था। कारण ये था कि मैं आर्य समाजी हूं। हमारे में मुर्तिपुजा तथा पांव छूना आदि अनेक कर्मकांडों की मान्यता नहीं है। फिर भी लगा के मेरा उनके साथ जुड़ाव है। पिता समान व्यक्ति हो सकते है। फिर कभी मिले या ना मिले।  
अब मैं मेरे परिवार की जानकारी दे दूं। मेरा नाम है प्रवीन, पत्नी का अनिता तथा हमारे बेटे का नाम है पंकज । मेरे पिताजी का नाम था जानकीदास तथा दादाजी का नाम मलावरम था। हम पार्टीशन के आसपास पाकिस्तान से मुंबई आए थे। हमारा परिवार बहुत बड़ा तथा एकठ्ठा था। मेरे दादाजी जिनका नाम मलवारम सोनी था, उस समय से नामी रईस थे। उनका कारोबार उन दिनों कराची तथा लाहौर में फलफूल रहा था, जो आजकल पाकिस्तान में है।
               ऐसे ही समय बीतता गया। फिर एक बार आसाम के श्री. सुशील भाटियाजी का बुलावा मई 1995 में आया, क्या चितलेबाबा को मिलने की इच्छा है? मुझे लगा कि आसाम में जाना है क्या फिर? उन्होंने कहा, नहीं, नही बाबा तो आजकल पुणें में आ गए हैं। तथा रिटायरमेंट के बाद शायद वहीं सेटल हो जाएंगे
तबसे फ़िर बाबा से जुड़ाव हो गया। मैं उन्हें तब से जानता हूं जब वे आसपास के घरों में किराए पर रहा करते थे और अनेक बार पानी भरते हुए देखकर बड़ा बुरा लगता था। फिर भी बाबा के चेहरे पर कभी शिकन का पता नहीं होता था। उन दिनों मैं पत्नी तथा पुत्र पंकज के साथ महिने में दो या कभी कभी तीन बार पुऩे आया करते थे।

पंकज के साथ का हादसा


इससे पहले बता दूं के चितले बाबाके काऱण उनके गुरू कै. काशीविश्वेश्वरजी से मेरा जुड़ाव बना तथा मेरी उनसे मुलाकात होती थी। ऐसेही एक बार...
शायद 2005 साल के ऑगस्ट का महीना होगा। चितले बाबा के जन्मगांव देऊलगावराजा होने के बाद हम (पु. काशीविश्वेश्वरनाथ) गुरूनाथजी से मिलने औरंगाबाद स्थित आश्रम में सुबह पहूंचे। तब उन्होंने अचानक कहा कि दिवाली से पहले कुत्ते को मार दो। हमने उन दिनों जर्मन शेपर्ड कुत्ता पाला था। उसे कैसे मार दें ऐसा सोचा था। शायद इसलिए उस बात पर हमने ज़ादा ग़ौर नहीं किया। उसी दौरान बातों बातों मे हम चार लोगों को खाने के लिए नाथजी आग्रह करने लगे । अब खाना कब बनेगा फिर वहांसे कब मुंबई पहुचेंगे ऐसे हम सोच रहे थे। फिर भी वहां की माताजी ने ऐसे खाना परोसा कि जैसे उन्हे हमारे आने की खबर पहले से थी। इसका राज़ पुछनेपर उन्होंने कहा, नाथजी ने आपके आनेसे पहले 4 लोगों का खाना बनाने के लिए कहा था और ऐसेही हमेशा होता है कि लोग बाद में आते हैं खाना पहले से तैयार रहता है
खैर, कुछ दिनों बाद दिवाली आई और अचानक पंकज को ब्रेन हैमरेज हुआ। एक तरफ डॉक्टरी इलाज़ चल रहा था और दुसरी तरफ हम चितलेबाबा के संपर्क में थे। तब बाबा ने कहा कि जहां तक मैं देखता हूं, एक कुत्ते का बाल पंकज के खाने में से उसके ब्रेन तक गया है । उसके कारण उसकी यह हालत हुई है। मेरी राय है की इस बाल की हकीकत डॉक्टरों के मशीनों में नही आएगी। फिर भी शांती रखो मैंने जालंधरनाथ बाबासे प्रार्थना की है। वे उसे जरूर ठीक करेंगे। आगे तीन हप्ते तक बाबा रात दिन हमारे सतत संपर्क में ऐसे थे की मानो पंकज उनका ही बेटा हो! इस के बाद बाबा के साथ हमारा जुड़ाव ज़ादा गह़रा हो गया।...
... और सच मानो, बाबा के कहने के अनुसार इलाज़ करने पर आज हमारा पंकज बिलकुल ठीक है! मानो वह हादसा उसके साथ हुआ ही नहीं था! तब याद आती है बाबा काशीविश्वेश्वरनाथजी ने जो कहा था – उनकी सलाह हम मानते तो शायद ऐसी परेशानी न आती!

कार ऐक्सिडेंट की अदभूत घटना


एक बार हम पुने से मुंबई जा रहे थे रात का समय था। उसपर जोरो की बारिश हो रही थी। कळंबोली के आसपास हमारी मारुती कार को एक बस ने ऐसी ठोकर दी के पुछो मत। हम तो बालबाल बच़ गए। पर मारुती कार नुकसान जरूर हुआ था।
उस रात में घूम रहे 2-3 गुंडों की हम पर बुरी नजर पडी। बाबा की प्रार्थना जोरों से चल रही थी । वे चले गए। फिर दुसरे आए। उनसे निपटे तो एक पंजाबी लड़का बाईकपर आया। हमसे पुछने लगा, क्या हुआ? कैसे हुआ?’ चलो में आपकी मदद करता हूं। कह कर उसने कार की चाबी लेकर कार शुरू की । कार ऐसे शुरू हुई मानो बंद हुई ही नहीं थी! फिर उसने मेरे बेटे से कहा की आप मेरी बाईक पर बैठो और हमारे पिछे-पिछे आते रहो। मैं पनवेल में रहता हूं और मेरा काम ही है कि ऐसे फंसे लोगों को सुरक्षित जगह पहुंचाना। आप चिंता मत करो । मेरे घर लेके चलता हूं । उसके घर पहूंचे, ऐसे रात के वक्त लोगों के साथ पति आए तो पत्नी का रुठा रुठासा बरताव कैसे होता है इसका अंदाज़ा आप अपने अनुभव से लगा सकते हो। लेकिन हम हैरान हुए जब हमारा स्वागत मुस्कुराते हुए हुआ। और उपर उसने ये भी कहा की कोई बात नही। ये हमारे पतिदेव अकसर लोगों के काम आते रहते हैं और ऐसी देरी हो जाती है। बाद में हम सोच रहे थे कि मानो याना  मानो ये बाबा की ही कृपा थी के उस रात पंजाबी लडका बाबा के आदेश पर हमारी रक्षा करने वहां आया था।
ऐसे बाबाजी के अदभूत किस्से कितने बताऊं उतने कम है। फिर भी ओक साहब ने मेरे से बिनती की तो उनके निवासपर ये बातें उन्होंने अपने मोबाईल पर टेप की और आप तक पहुंचाई है। मैं उनका धन्यवाद करता हूं।
लेखन काल - दत्त जयंती, 9 -10 दिसंबर 2011.

Wednesday 25 January 2012

हवाईदलातील एक स्नेही श्री. नारायण विठ्ठल गोखले यांचे अनुभव


चितळेबाबा साधक अनुभव
श्री. नारायण विठ्ठल गोखले.
माझ्या आयुष्यात आलेले, घडलेले, घडवले गेलेले संबंध, घटना, मी अक्षर रुपाने निवेदन करण्याचा प्रयत्न करत आहे.
चितळेबाबांची व माझी पहिली भेट सन 1982 जानेवारीच्या सुमारास हवाईदलातील एका स्टेशन वर झाली. बाबांचे गच्च भरलेले शरीर, प्रचंड शक्ती व त्यांच्या सत्यवचनी स्वभावामुळे आमची लवकरच मैत्री झाली. अरे-तुरेच्या संबोधनाचे नाते निर्माण झाले. तरीही इथे मी आदरार्थी संबोधनाने त्यांचा उल्लेख करणार आहे. असो.
त्यानंतरच्या काळात आमचे थोरले चिरंजीव रवीला, आर्मीत कमिशन मिळाले होते. दुसरा मुलगा विवेक एम. टेक करीत होता. निवृत्तीनंतर धाकटी मुलगी-कल्पना-सह आम्ही पुण्याला निघालो होतो. त्यावेळी बाबा म्हणाले, चिंता करू नको आपली परत भेट होईल. जा, तू तिथे जाऊन घर घेणार आहेस. ते घे. बाबांनी सांगितल्यासारखे आम्ही सध्या राहात असलेले त्रिदल सोसायटीतील घर (फ्लॅट) आकस्मिकरित्या मिळाला. स्वतःच्या घराचे आमचे स्वप्न आणि बाबांचे बोल खरे ठरले.
आमचा संसार खुशीत सुरू होता. मुलांचे विवाह होऊन त्यांनी संसार थाटले. पण चि. कल्पनाचा लग्नाचा योग सतत प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी काही न काही अडचणी येऊन जुळून येत नव्हता. त्यामुळे आम्ही उभयता फार काळजीत होतो. आता तर हवाईदलातील सेवेतून निवृत्त होऊन 9 वर्षे झाली होती.
सन 1995 मधे एका संध्याकाळी बाबा (त्यांना आम्ही बाबा भूतनाथ म्हणून पुर्वीपासून संबोधतो.) अक्षरशः भुतासारखे प्रकटले! आम्ही प्रेमाने मिठ्या मारल्या. त्यांनी माझ्या चरणावर डोके ठेवले. तेंव्हा मला एकदम गदगदून आले. मी काही तसा मोठा नाही पण बाबांहून वयाने वरिष्ठ होतो एवढेच. (बाबा जेंव्हा नतमस्तक होतात तेंव्हा त्या भावना शब्दांनी सांगता येत नाहीत. त्या अनुभवाव्या लागतात. विचार सुरू होतात. न संपणारे....!)  

कल्पनाचा विवाह घ़डवला आणि आईचा मृत्यू पुढे  ढकलला!


आम्ही आमची काळजी त्यांच्या कानावर घातली. त्यावेळी बाबा हसले अन् म्हणाले, अरे कल्पनाच्या लग्नाची काळजी करू नकोस. आता मी आलोय न, लवकरच तिचे लग्न जमेल. आणि तिचे लग्न अगदी दोन महिन्यात झाले देखील! सध्या ती पुण्यात असते. तिच्या लग्नाच्यावेळी, कल्पनाला एकच अपत्य असेल. दुसरे असणार नाही असे म्हटले होते. बाबा म्हणाले होते, मी सांगतो ते सत्य आहे. मात्र त्यातही असत्य दडलेले आहे. कारण प्रभू काहीही करायला समर्थ आहेत. पण बाबांनी म्हटल्यासारखे तिला एक मुल आहे ते सध्या दहावीत आहे.
गुरुवारच्या आरतीवेळी बाबा शंख फुंकताना, गोखले काका घंटी वाजताना

गुरूवारच्या आरतीला मी त्यांच्या सोबत बसून पुजेची सर्व तयारी करून देत असे. 1996ची गोष्ट असेच एकदा मी गुरुवारच्या आरतीला गेलो असता बाबांना म्हणाले, तुझ्या घरी काही अदभूत घडत आहे. त्यात तुझ्या आईचा मृत्यू दिसतोय. मी प्रचंड घाबरलो. माझी अवस्था पाहून बाबा म्हणाले, मी एक करू शकतो, तिचा मृत्. तीन महिने पुढे ढकलू शकतो आणि बाबांनी त्याप्रमाणे 16 मे पर्यंतची तारीख दिली. त्यानंतर माझ्या आईचे देहावसान 11 मे 1996ला झाले. अन् बाबांचे बोल खरे ठरले.  

पोटाचा आजार व गाईच्या शेणाचा लेप!


साधारण 2005ची गोष्ट. मी एकाएकी आजारी पडलो. प्रचंड थकवा आल्यामुळे पुणे हॉस्पिटलला भरती झालो. सर्व उपचार व टेस्ट्स करूनही डॉक्टरना निदान करता येत नव्हते. त्यांनी बोन मॅरो ही करून पाहिला. त्यात त्यांना पोटातील मोठ्या आतड्याला टीबी झालाय असल्याचे निदान केले. औषधोपचार सुरू झाला. पण प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली होती. शरीरातील हिमोग्लोबिन चारवर आले होते. दिवसभर पोटात 2-4 चमचे अन्न म्हणून बळजबरीने घातले जात होते. या आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होतो. उठता-बसता येईना. काय झालेय ते ही कळेना. अशातच डॉक्टरांनी आमच्या सौंना सांगितले की प्रकृती जास्त बिघडली आहे. आता काही खरे नाही! तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलावून घ्या! ते ऐकून पत्नी पुतळ्यासारखी निस्तब्ध झाली. ती तशी एकटी होती. मोठा मुलगा हजर नव्हता. धाकटा परदेशात दौऱ्यावर गेला होता. नंतर सावरून तिने बाबांना फोन केलान, आता काय करू? म्हणून, करुणा भाकली. माझ्या आजाराची सर्व माहिती तिने त्यांना सांगितली. मग बाबा म्हणाले, घाबरू नका. मी त्यांना घरी आणेन. त्यापुर्वी एक काम करा. गोखले साहेबांना आहे त्या परिस्थितीत तसेच हॉस्पिटलमधून बाहेर काढा. दवाखान्यातील सर्व औषधे वाटेत वाहत्याप्रवाहात सोडून द्या. मग तुमच्यापैकी कोणाला तरी गाईचे शेण घेऊन माझ्याकडे पाठवा. 
बाबांनी सांगितल्यासारख्या सुचनांप्रमाणे आम्ही माझ्या मुलीकडे आलो. पत्नीचे बंधू श्री.शाम साठे गाईचे शेण घेऊन बाबांकडे गेले. बाबा आकाशाकडे पाहून हसले व काही मंत्रून ते मला डोक्याच्या केसांपासून ते पोटापर्यंत लेप देऊन संपुर्ण अंगावर पांघरुण घालायला सांगितले. त्यानंतर मी दोन दिवसांनी थोडा शुद्धीवर आलो. तेंव्हा मला खरेच बरे वाटू लागले आणि पुढे तर जशी जादूच झाली! 3-4 आठवड्यात मी आपोआप कोणत्याही औषधाविना पुर्णपणे स्वस्थ झालो! घरातच चालायला फिरायला लागलो.

माझे तिरुपती यात्रा भ्रमण  


बाबांच्या आशीर्वादाने मी बरा झालो असताना बाबांनी आज्ञा केली की जा आता देवाचे दर्शन घेऊन या. तुझा काळ आला होता व पण वेळ आली नव्हती. त्याप्रमाणे आम्ही मुलांसह बालाजीच्या दर्शनला गेलो. त्यावेळी माझ्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 5 ते 6 इकतेच होते. WBC कमी होत्या. त्याही परिस्थिती आम्ही तिरुपतीला पोहोचलो. त्यावेळी मी गडाच्या पायऱ्या पासून ते थेट वर 7-8 किमी अंतर स्वतःच्या पायाने कसा चढून गेलो ते सांगणे अशक्य आहे. पण एवढे मात्र खरे की या प्रवासात बाबा माझ्या फारच जवळ आहेत असे जाणवत होते. त्यांचा आवाज, त्यांचा देह दिसत होता. पण ते काय कोण होते. ते कळत नव्हतं. अशा प्रकारे तिरुपतीचे दर्शन घेऊन आम्ही परतलो, पुढील चार महिन्यात पुर्णपणे बरा झालो. मग मला झालेला आतड्या टीबी गेला कुठे असा मला प्रश्न पडतो. आणि बाबांची आमच्यावर असलेली कृपा याची जाणीव प्रकर्षाने होते.
बाबा म्हणजे एकसाऱखे सिटरेट-बिडी पिणारे, सतत हसणारे असे कधीही समजून येऊ शकणारे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे असेच वाटते. असे अजून पुष्कळ अनुभव आहेत ते सविस्तर निवेदन करणयातचा प्रयत्न परत केंव्हातरी करेन.
।।अल्लख निरंजन।।

Sunday 1 January 2012

चिन्मय ओक सांगतायत आपले विचार


आमचे चितळे बाबा

चिन्मय ओक दि 01जानेवारी 2012.

नमस्कार, माझे नाव चिन्मय ओक. खरे तर लहानपणापासून माझा देवावर विश्वास कमी, त्यात मी ओशोचा मोठा फॅन. त्यामुळे मूर्ती पूजेवर माझा विश्वास कमीच. अशाच मनःस्थितीत माझी पु. चितळे बाबांशी भेट झाली. सुरुवातीला मला ते अगदी साधे वाटले. त्यांच्यात “गुरु” म्हणण्यासारखे काही वाटले नाही. गुरु म्हटल्यावर आपल्या समोर एक वेगळीच आकृती उभी राहते. केसांची मोठी जटा, कपाळ भर गंध, भगवे वस्त्र, खांद्याला झोळी इत्यादि ...

मी जेव्हा बाबांना पहिल्यांदा पाहिले तेंव्हा ते अगदी क्लीन शेव्हन, व्यवस्थित भांग पाडलेले, साध्या कपड्यात दिसले.

मी सर्वात प्रथम बाबांकडे सन १९९९ मध्ये बहिणीच्या डोकेदुखीच्या त्रासामुळे गेलो होतो. त्यांनी तिचा डोक्याचे दुखणे अवघ्या काही तासात बरे केले. (जी डोकेदुखी बरेच दिवस डॉक्टरांकडे जाउन देखील ठीक होत नव्हती). हा माझा पहिला अनुभव. मी पहिल्यांदाच गेलो असताना त्यांनी मला गुरुवारच्या पूजेला बोलावले. मला पूजेत रस नसल्यामुळे मी काही लगेच गेलो नाही. काही दिवसांनी मी पुन्हा बहिणी बरोबर गेलो असताना त्यांनी मला गुरुवारी न आल्याबद्दल आवर्जून विचारले. तेव्हा पासून आजपर्यंत मी गुरुवारच्या पूजेत येतो आहे.

मी त्यांना सुरुवातीला काही दिवस “महाराज” म्हणायचो पण थोड्याच दिवसांनी त्यांना “बाबा” संबोधायला लागलो. कारण “बाबा” या शब्दात जास्त आपुलकी वाटते.

जेव्हा कधी कुठला अनोळखी माणूस आपला प्रॉब्लेम घेउन बाबांकडे येतो. त्यावर बाबा त्याला “बेटा घबरा मत... बाबा के होते हुए कोई घबराने की बात नही” सांगतात (अशा वेळी ते ज्यांना बाबा म्हणतात ते म्हणजे बाबा जालंधरनाथ) आणि तत्क्षण प्रॉब्लेम घेउन आलेल्या माणसाच्या चेहेऱ्यावर नैराष्याचे भाव जाऊन आशेचा उजेड दिसु लागतो. बाबांनी त्याला पूर्ण बरे व्हायचे आश्वासन दिल्यावर तो आनंदी मनाने घरी जातो. काही दिवस बाबांनी सांगितलेले औषधोपचार आणि तोडगे केल्यावर, त्याचावर आलेल्या कठीण प्रसंगातून तो सहजरित्या बाहेर पडतो. त्याचे काम पूर्ण झाल्यावर जेव्हा बाबांना सांगायला तो येतो, तेंव्हा बाबा अगदी सहजपणे त्याला आठवण करून देतात, “मैने तो कहा ही था, बाबा के दरबार मे कोई खाली हात नही जाता”. अश्या रीतीने बाबांना अनोळखी असणारा माणूस सहजच बाबांचा शिष्य बनून जातो.

बाबा नेहमी म्हणतात, “बाबा होना आसान नही है ”. याचा अर्थ आम्हाला बऱ्याच वर्षांनी कळला. बाबा प्रत्येकाला समान वागणूक देतात. त्यांच्या लेखी जात, धर्म, उच्चपदी ऑफिसर किंवा चपरासी सगळे सारखेच. बाबांना आपल्याकडे आलेल्या माणसाचे दुखः पूर्णपणे जाणतात तसेच त्याच्या आनंदात पूर्णपणे सामील होतात. त्यामुळे बाबा सगळ्यांना आपले आपलेसे वाटतात. बाबांचे घर सगळ्यांसाठी सतत उघडे. तोच त्यांचा “आश्रम”. बाबांनी गृहस्थाश्रमात राहून अध्यात्मिक होउन दाखवले. बाबांनी संसारात राहूनच अध्यात्म साधले. संसार आणि अध्यात्मातला तोल सांभाळून गेली कित्येक वर्षे ते महाराजांची सेवा करत आहेत. बरेच लोक नुसते गप्पाच मारताना आपण पहातो मात्र आमच्या बाबांनी सांगितले ते केले असे प्रत्यक्षात करून दाखवल्याचे अनेक दाखले आहेत.

आमचे बाबा बहुआयामी आहेत. बाबांचे अनेक शिष्य. प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम. सगळे जण आपला प्रॉब्लेम बाबांना सांगून मोकळे होतात. सगळ्यांना माहित आहे बाबा असताना काही घाबरायचं कारण नाही. बाबांचे प्रत्येकाशी वेगळे नाते आहे. समोर बसलेल्या व्यक्तीची कुवत, त्याची मानसिक स्थिती, त्याचा ओढवलेला प्रसंग याच भान ठेउन बाबा सगळ्यांशी वागतात. बाबा कुणालाच निराश करत नाहीत. प्रत्येक शिष्याला आपुलकीने विचारपूस करतात, वेळोवेळी सल्ला देतात, त्यांच्या अनेक अडचणी यायच्या आधीच त्याचा तोडगा सांगतात. बाबांनी एकदा का कुठली केस हातात घेतली कि तो पेशंट बरा होई पर्यंत बाबांचे त्यावर पूर्ण लक्ष असते. त्यात त्यांना रोगाचं “फीड बॅक” देणे अत्यंत महत्वाचे असते. खूप वेळा बाबा स्वतः फोना-फोनी करून विचारपूस करतात. तो पेशंट पूर्ण बरा झाल्यावरच बाबा शांत बसतात.

माझा व बाबांचा आणखी एक जवळचा धागा आहे. त्यांच्या पत्त्यांच्या अड्डयातील मी एक भिडू आहे. दश्शी पकडसाठी. त्यामुळे आनंद धाग, पराग पटवर्धन, अबु उर्फ अभिजित, शिवाय अधुन मधून पपु उर्फ शैलेश असे दश्शी पकडीत बाबांचे भिडू बनतात.

सामान्यतः दर गुरुवारी पुजेनंतर रात्री 10 ला आमची बैठक सुरू होते. मध्य रात्र उलगडते. त्यानंतर आम्ही घरोघरीवर कधीतरी परततो. आज काल मला विवाहानंतर शनिवारी वेळ मिळू लागल्याने तो वार बाबांनी ठरवला आहे. खेळताना डावाकडे, हातातील पत्यांकडे काय खेळायचे व कसे विरुद्ध बाजूला हरवायचे याचे प्लानिंग करावे लागते. सतर्कपणे खेळावे लागते. त्यात पुन्हा जर बाबांचा भिडू असलो तर विशेष खबरदारी घ्यावी लागते. नाहीतर बाबांची खपा मर्जी व्हायला काय वेळ?

... काही वर्षांपुर्वीपर्यंत राजेश नारायणन नावाचा उमदा प्रिय तरुण साधक आमच्यातून दुरावला. त्याचे वैषम्य बाबांना फार आहे... चार लोक नसतील तर बाबा मग रमी उर्फ पपलूवर समाधान मानतात. तर कधी बुद्धिबळाचा पट पसरून ठाकुर सरांच्या हितेश, विक्रम दालमिया, नाही तर भेटायला आलेल्या उत्साही साधकांना बाबा पटावर बसवतात.

तर असे आमचे बाबा.... आणखी आठवले की भर जरूर घालेन सध्या इतकेच....